नात्यांचं आणि फुलांचं दोघांच एक सारखं असत ...
कळी पासून फुलायला  आणि मनापासून जुळायला 
दोघांच्या वेळेच एकाच खात ..
नात्यांचं आणि ढगांचं , दोघांचही सारखच असत ..
जेवढे गाढ रंगांचे दोघे .. तेवढ्याच  आनंदाच्या  वर्षावात मन सतत असत   ...
नात्यांचं आणि पाखराचं .. ह्याचं पण सारखच ..
स्वतंत्र भिरभिरतात मुक्त आसमंतात .... 
पण निवारा घेतात आपल्या  घरट्यात 
पण नात्याचं आणि मनाचं .. फार क्वचितच जुळत 
दूर जाणाऱ्या मनाला मात्र .. नात्याचं  कधी भानच नसत ......
 
No comments:
Post a Comment